जय श्रीराम
श्रीमहाराजांच्या आणि नितीनदादांच्या कृपाशीर्वादाने आज श्रीकांतदादांनी 'विचार पादुकां'वर वाहिलेल चिंतन पुष्प आपल्यासमोर ठेवत आहे. दादा तर आपल्या बरोबर कायमच आहेत. त्यांची आठवण रोज येत असते पण भेट होत नाही. मग काय करायचे असा विचार श्रीकांतदादा करीत असताना दादांनी दिलेल्या विचारांवर विचार करावा असे ठरवले. हे विचार श्रीकांतदादांनी दादांबरोबरच्या बोलण्यातून, रेकॉर्डिंग मधून किंवा सत्संगातून सांगितलेले घेतले आहेत. दादांचे विचार कळावेत व मनात घोळत रहावेत कि ज्यायोगे दादांनी दिलेल्या नामाचे प्रेम वाढून सतत नामस्मरण, अखंड नामानुसंधान दादा आपल्या कडून करून घेतील. या 'विचार पादुकां'ची पूजा चिंतन पुष्पाने करण्याचा खूप उपयोग होत आहे. तसाच आपणा सर्वांना त्याचा लाभ व्हावा म्हणून हा पुष्प गुच्छ आपल्यासमोर विचारासाठी व त्याप्रमाणे कृतीत आणण्यासाठी ठेवत आहे. दादांच्या प्रेरणेने जशी विचारांची चिंतन पुष्पे उमलतील तशी आपणापर्यंत दादांच्या कृपेने पोहोचवण्याचा विचार आहे.
जय श्रीराम
24-05-2020 09:55 pm / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : पुणे